नाशिकया नेत्यांनी मांडला शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा ठराव

या नेत्यांनी मांडला शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा ठराव

spot_img

नाशिक : शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन नाशिक येथे संपन्न झाले. या अधिवेशनात विविध ठराव घेण्यात आले. त्यामध्ये धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याबाबतच्या ठरावासह एकूण ३ ठराव घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

सदरचा ठराव ठराव खासदार राजन विचारे यांनी मांडला. तर या ठरावाला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनुमोदन दिले. त्याबरोबरच महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर सकल मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देताना ओबीसींसह इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणास हात न लावता मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, असा ठराव झाला.

यासोबतच मुंबई आणि मराठी माणसांसाठी प्राणप्रणाने लढण्याच्या ठरावासह कामगारांच्या हिताच्या दृष्टीने ठराव सामाजिक सुरक्षा 2020, व्यवसायी सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020, वेतन 2019 हे कायदे तसेच महाराष्ट्रातील कामगार व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरतीसाठी मंजूर केलेली अधिसूचना तत्काळ रद्द करावी. सरकारी सेवेसाठी नोकरभरती ही कायमस्वरूपी आणि राज्य लोकसेवा आयोगातर्फेच करावी यामध्ये कोणत्याही प्रकारे खासगी व्यक्ती वा संस्थांना निवड प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये असाही ठराव करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...