ब्रेकिंगजाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

spot_img

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार केलेल्या ऐतिहासिक ‘मणिकर्णिका घाट’ वाराणसी महानगरपालिकेने ‘विकासाच्या’ नावाखाली कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबी फिरवून उद्ध्वस्त केला आहे. हा केवळ दगड-मातीचा घाट नसून आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आणि अहिल्यादेवींच्या दातृत्वाची जिवंत साक्ष होती. विकासाच्या नावाखाली अशा ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची मोडतोड करणे अत्यंत निंदनीय आहे. वाराणसी महानगरपालिकेच्या या दुष्कृत्याचे पुण्यश्लोक फाऊंडेशन आणि धनगर माझा परिवाराच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.

खाजगी अहिल्यादेवी होळकर ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज महाराज यशवंतराव होळकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करून या घाटाचे पुनर्वसन करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.

या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. तसेच सर्व स्तरावरून याचा निषेध करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...