महाराष्ट्रॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

spot_img

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा पाटील हे मागील १९ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. आपल्या व्यवसायासोबतच ते सामाजिक कार्यात देखील सक्रिय असतात. याची दखल घेऊन मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आयोजित, अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात ॲड. अभिमान पाटील यांना मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रम अनिल म्हमाणे यांच्या माध्यमातून मुस्लिम बोर्डिंग हॉल कोल्हापूर येथे दिनांक २५/०१/२०२६ रोजी पार पडला.

एका शेतकरी कुटुंबातून असलेले ॲड. अभिमान पाटील हे आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. विविध न्यूज चॅनेलवर त्यांचे सामाजिक विषयांसंदर्भात मुलाखती आणि चर्चासत्रे उपलब्ध आहेत. ॲड. अभिमानजी जनहित याचिका, सामाजिक न्यायाच्या बाबी, राष्ट्रीय हिताच्या बाबी या प्रकरणांमध्ये नियमितपणे मोफत वकीलपत्र घेतात. ते पर्यावरण संरक्षण उपक्रमांमध्ये सक्रिय असून वंचित आणि उपेक्षित समुदायांना कायदेशीर मदत करतात.

वंचित आणि उपेक्षित समुदायांना राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना संवैधानिक सक्षमीकरणाद्वारे भारताचे भविष्य घडवण्यास सक्षम करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. सध्या ते मुंबई उच्च न्यायालय आणि कोल्हापूर खंडपीठ येथे कार्यरत असून ॲड. अभिमान पाटील यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...