पुणेउच्चशिक्षितांनी विविध कार्यक्रमातून समाजाप्रति बांधिलकी जोपासणे काळाची गरज : आ. राम शिंदे

उच्चशिक्षितांनी विविध कार्यक्रमातून समाजाप्रति बांधिलकी जोपासणे काळाची गरज : आ. राम शिंदे

spot_img

पुणे : समाजामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात पण इतर कार्यक्रमांपेक्षा वधूवर मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती चांगली असते विशेष म्हणजे अशा कार्यक्रमांना उच्च शिक्षितांचे प्रमाण जास्तच असते. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये उच्चशिक्षितांनी विविध कार्यक्रमातून समाजाप्रति बांधिलकी जोपासणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केले. ते पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या वधूवर मेळाव्यात बोलत होते. धनगर समाज सेवा संघाचा १६ वा राज्यस्तरीय भव्य वधू वर मेळावा रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव येथे संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, मा. महापौर उषा ढोरे, मा. नगरसेवक नाना काटे, डॉ.लक्ष्मण गोफण,  प्रविण काकडे, उज्ज्वला ताई हाके, डॉ.नारायण सुर्वे, , हनुमंत गावडे, जयवंत कवितके, अजित लकडे, पोपटराव येळे, कैलास राव थोपटे, आशाताईं शेंडगे, राजेंद्र राजापुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर वधूवर मेळावा यशस्वी करण्यासाठी धनगर समाज सेवा संघाचे दिलीप काटकर, विजय भोजणे, , भास्करराव गाडेकर, दर्शन गुंड, रविंद्र कोकाटे, राजेंद्र कवितके, विठ्ठल कडू, डॉ. दिनेश गाडेकर, काळूराम कवितके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद कुचेकर यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...