महाराष्ट्रनिवडणुकीच्या तोंडावरही राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या मागण्यांची अवहेलना, ४ महिन्यापूर्वी केलेल्या घोषणेची...

निवडणुकीच्या तोंडावरही राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या मागण्यांची अवहेलना, ४ महिन्यापूर्वी केलेल्या घोषणेची पुन्हा घोषणा

spot_img

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबाजवणी करण्याच्या मागणीने जोर धरला असताना त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करून पुन्हा शक्तिप्रदत्त समिती नेमण्याची घोषणा करून राज्य सरकारने धनगर समाजाची अवहेलना केल्याचे दिसून येत आहे.

धनगर समाजाप्रती शासन संवेदनशील असून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच धनगर समाजासाठी असलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पुन्हा विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. सदर निवेदन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

धनगर समाजासाठी आदिवासी योजनांच्या धर्तीवर जाहीर केलेल्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीत शक्तिप्रदत्त समिती नेमण्याची घोषणा केली होती. यामध्ये ७ संबंधित विभागातील अधिकारी व ६ महसूल विभागातून प्रत्येकी एक अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करणार होते. पण या घोषणेला ४ महिने उलटून गेले पण अद्याप मुहूर्त लागला नाही. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री सावे यांनी कदाचित धनगर समाजाला खुष करण्यासाठी विधानसभेत निवेदन देवून पुन्हा शक्तिप्रदत्त समिती नेमण्याची घोषणा केली. यामुळे धनगर समाजामध्ये संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...