महाराष्ट्रआवर्जून पहा : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाचा सुधारित बिंदूनामावलीतील बिंदु क्रमांक

आवर्जून पहा : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाचा सुधारित बिंदूनामावलीतील बिंदु क्रमांक

spot_img

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी भारतीय राज्य घटनेच्या कलम १५ (४), १५(५), १६ (४) व ४६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) असा नवीन वर्ग तयार करण्यात आला आहे. या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम ५ (१) अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) वर्गासाठी, राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सुधारीत बिंदुनामावली प्रसिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे असे दर्शविले आहे की सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी (एसईबीसी) संदर्भाधीन क्रमांक १ येथील अधिनियमातील कलम ६ अनुसार गुणवत्तेवर नियुक्त झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांची संबंधित वर्गाच्या आरक्षित पदावर गणना करण्यात येऊ नये. त्यांची नियुक्ती संबंधित आरक्षण बिंदुवर दर्शवू नये. त्यांची नोंद खुल्या प्रवर्गातील बिंदुवर दर्शविण्यात यावी. त्यामुळे धनगर समाजाचा सुधारित बिंदूनामावलीतील बिंदु क्रमांक पूर्वीप्रमाणे ७, ३१, ५७ व ९९ हे पूर्वीप्रमाणे कायम आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...