महाराष्ट्रधनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेमलेल्या डाॅ.सुधाकर शिंदे समितीचा अहवाल शासनास सादर, तातडीने धनगर...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेमलेल्या डाॅ.सुधाकर शिंदे समितीचा अहवाल शासनास सादर, तातडीने धनगर ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

spot_img

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या डाॅ.शिंदे समितीचा अहवाल आज सादर झाला. त्यामुळे धनगर आरक्षणाचा मार्ग खुला झाला आहे. तरी राज्य सरकारने तातडीने धनगर ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली.

धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या अभ्यास समितीने आज बहुजन विकास मंत्रालयाच्या प्रमुख सचिव विनिता सिंघल यांच्याकडे सादर झाला. यासंदर्भात बी.के.कोकरेप्रणित यशवंत सेनेचे दोडतले म्हणाले की, गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये यशवंत सेनेने आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथे एकवीस दिवसाचे आमरण उपोषण केले होते. त्यानंतर राज्य शासनाने इतर पाच राज्यांतील आरक्षणाची कार्यपद्धतीचा अभ्यास करुन राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी डाॅ.शिंदे समितीने समिती नेमलेली होती. या समितीत यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील व संघटक जी.बी. नरवटे हे दोन सदस्य नियुक्त होते. आज या समितीने अभ्यास अहवाल शासनास सादर केला आहे. राज्यातील जवळपास दोन कोटी धनगर समाज घटनात्मक आरक्षण अमलबजावणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलन करीत आहे. आज अभ्यास समितीचा अहवाल सादर होत असतानाच खिलारे यांची आस्तित्वहीन धनगड जमातीची सर्टीफिकेटस रद्द झालेली आहेत. राज्य सरकारला धनगर आरक्षण अमलबजावणीसाठी इतकी सकारात्मक व पोषक स्थिती पहिल्यांदाच तयार आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारला अनूसुचित जमाती यादीत अ ब क अशी वर्गीकरण करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आले. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विनाविलंब आरक्षण अमलबजावणी करावी. अन्यथा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा दोडतले यांनी दिला. यावेळी यशवंत सेनेचे आण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, समाधान पाटील, बाबासाहेब भोजने, दिलीप गडदे, किरण धालपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...