पुणे..तर एकाही प्रस्थापित पक्षाला धनगर समाज मतदान करणार नाहीत

..तर एकाही प्रस्थापित पक्षाला धनगर समाज मतदान करणार नाहीत

spot_img

पुणे : भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा संभाजीनगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल. यामध्ये जवळपास ५०० तरुण आमरण उपोषण करतील. एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. एसटी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही, तर येत्या निवडणुकांत धनगर समाज एकाही प्रस्थापित पक्षाला मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आली.

सकल धनगर समाजाच्या वतीने गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी, राजकीय भूमिका, आरक्षणासाठीचा न्यायालयीन व रस्त्यावरील लढा, आगामी निवडणुकीच्या संदभार्ने धनगर समाजाची भूमिका ठरवण्यासाठी धनगर समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासक, उपोषणकर्ते, कार्यकर्ते एकवटले होते.

धनगरांना एसटी आरक्षण, विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व, धनगरांचे एकीकरण, कलम ३४२ (१) नुसार राज्यपालांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी, डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करावा आदी ठराव करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील धनगर बहुल मतदारसंघातून यशवंत संदेश यात्रा काढण्याचा निर्णय झाला असून, विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाडण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...