ब्रेकिंगदेशात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजले, १५ राज्यांमधील राज्यसभेच्या निवडणुका जाहिर

देशात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजले, १५ राज्यांमधील राज्यसभेच्या निवडणुका जाहिर

spot_img

वी दिल्ली : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, , आणि राजस्थान या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने केली. या घोषणेमुळे देशात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजले आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या निवडणुकांसाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होईल.

राज्यनिहाय राज्यसभेच्या जागा
महाराष्ट्र – ६, तेलंगणा – ३, उत्तर प्रदेश – १०,  कर्नाटक – ४, मध्य प्रदेश – ५, उत्तराखंड – १, पश्चिम बंगाल – ५ ओडिशा – ३ आंध्र प्रदेशातील – ३, बिहार – ६, छत्तीसगड – १, गुजरात – ४, हरियाणा – १, हिमाचल प्रदेश – १, आणि राजस्थानमधील राज्यसभेच्या ३ जागांचा समावेश आहे. वरील १५ राज्यांमधील ५६ खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत असल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील यासहा खासदारांचा कार्यकाळ संपणार

  • कुमार केतकर (काँग्रेस)
  • वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
  • प्रकाश जावडेकर (भाजप)
  • मुरलीधरन (भाजप)
  • नारायण राणे(भाजप)
  • अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...