कोल्हापूरश्री. फरांडे बाबांची भाकनूक ठरली सत्य, राजकारणामध्ये उलथापालथ होऊन राज्यात फडकला भगवा

श्री. फरांडे बाबांची भाकनूक ठरली सत्य, राजकारणामध्ये उलथापालथ होऊन राज्यात फडकला भगवा

spot_img

पुणे : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री फरांडे बाबा यांनी केलेली भाकणूक अखेर खरी ठरली आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

              दिनांक २१ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथे श्री विठ्ठल बिरदेव यांच्या नावाने ‘चांगभलं…’चा अखंड गजर करत प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत श्री फरांडे बाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा मंदिरात पार पडला होता.  यावेळी राजकारणामध्ये उलथापालथ होऊन राज्यात भगवा फडकेल, अशी भाकणूक त्यांनी केली होती. विशेष म्हणजे सर्व प्रसार माध्यमासहित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर विश्वास ठेवून आपल्या भाषणातून उल्लेख केला होता.

               यापूर्वीहि पट्टणकोडोली यात्रेत फरांडे बाबांनी अनेक भाकणूका केल्या होत्या. त्या सत्य ठरल्या आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल बिरुदेव व फरांडे बाबा भक्तांमध्ये आनंदाचे, चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...