महाराष्ट्रतुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, गुवाहाटी फेम आ. शहाजी पाटलांना...

तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, गुवाहाटी फेम आ. शहाजी पाटलांना डॉ. देशमुखांचा सणसणीत इशारा

spot_img

सांगोला : आमच्यावर आबासाहेबांचे संस्कार आहेत, ते आम्ही प्राणापणाने जपू. त्यांचा नातू असल्याचा अभिमान तर आहेच, पण त्यांच्या विचारांचा जागरही तूसभर कमी होऊ देणार नाही. तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आ. शहाजीबापू पाटील यांना दिला आहे.

जे आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं? आमच्या नादाला लागू नका अशा बोचर्‍या शब्दात आ. शहाजी पाटील यांनी विश्वविक्रमी आमदार कै. माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी नवख्या डॉ. बाबासाहेब यांना कडक शब्दात आ. शहाजी पाटलांचा समाचार घेतला

डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, कोण किती पाण्यात आहे हे तालुक्यासह उभ्या राज्याला माहीत आहे. स्व.आबासाहेबांवर टीका करण्याची विद्यमान आमदारांची पात्रता नाही. स्वच्छ, निर्मळ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी म्हणून आबासाहेबांची देशभर ओळख आहे. त्यामुळे आमचं गणित घालायच्या भानगडीत पडू नका असे देशमुख म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल, शिवाय गेल्या ३० वर्षांपासून अशा हिशोबावरच त्यांची गुजराण केल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले. अशा हिशोबातूनच १९९९ मध्ये  जेलवारीही करून आला आहात. तसेच अशा प्रकारचे हिशोब घालूनच तुम्ही तालुक्यातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राखरांगोळी केल्याचे देशमुख म्हणाले. त्यामुळे हिशोब, गणित घालायच्या भानगडीत पडू नका, असा सणसणीत इशारा देशमुख म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...