बीडचलो मुंबई : २२ फेब्रुवारी रोजी निघणार चौंडी ते मुंबई धनगर आरक्षण...

चलो मुंबई : २२ फेब्रुवारी रोजी निघणार चौंडी ते मुंबई धनगर आरक्षण दिंडी

spot_img

बीड : राज्य सरकार वारंवार धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला असून 22 फेब्रुवारी रोजी चौंडीहून मुंबईकडे धनगर आरक्षण दिंडी काढणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलतोडे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली. याकरिता बीडमध्ये ११ फेब्रुवारीला इशारा मेळावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत शिंदे समिती नेमली. मात्र समिती स्थापन होवून एक महिना लोटला असला तरी अजून पर्यंत शिंदे समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला नाही. केवळ दोनच राज्याचा दौरा केल्यामुळे सरकारबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे.
११ फेब्रुवारीच्या इशारा मेळाव्यांपर्यंत जर सरकारने निर्णय दिला नाही तर १७ फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या जन्मगावातून आरक्षण दिंडी मुंबईकडे काढण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारीला मुंबई येथे पोहोचून आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...