धुळेतब्बल २५ ते ३० वर्षानंतर मिळाला ठेलारी समाजाला न्याय, मंत्रालयात पेढे...

तब्बल २५ ते ३० वर्षानंतर मिळाला ठेलारी समाजाला न्याय, मंत्रालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

spot_img

मुंबई : धनगर समाजाची तत्सम जमात असलेल्या ठेलारी समाजाला मागास प्रवर्गाच्या एन टी ब मधून एनटी क मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने आज घेतला असून तसा जीआर काढला. यामुळे तब्बल २५ ते ३० वर्षापासून चालू असलेल्या ठेलारी समाजाच्या संघर्षाला न्याय मिळाला. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा ठेलारी समाजाने मंत्रालयात पेढे आनंद उत्सव साजरा केला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले. तसेच पद्मश्री तथा मा. खा. डॉ. विकास महात्मे, मा. मंत्री अतुलजी सावे , माननीय मंत्री संजयजी बनसोडे या सर्वांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, ठेलारी समाजाचे नेते विठ्ठल भाऊ मारणार, बाबासाहेब दगडे, संदीप माने, वामनराव मारणार, पावा गोवेकर, देवा गोयकर, बापू कोळपे, गोपाल सोनू, लक्ष्मण शिंदे, राजू पाल आदीजन उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...